अशीच कधी मी रमले होते
तुडुंबलेल्या चंद्रामध्ये,
चंद्रावरुनी तरंगणाऱ्या
इवल्याइवल्या मेघांमध्ये
माझ्यामध्ये.
डिवचून गेले तोच कुणी तो
क्षणैक हलली
काळी छाया
तिमिराच्या वाऱ्यावर.
तेव्हापासून अखंड आहे जागी.
भिरभिर डोळे
बुडे बाहुली त्या छायेमधी.
थरथर स्पर्शांचे संवेदन
त्या स्पर्शाच्या तुकड्याभवती.
शनिवार, ३ जुलै, २०१०
उरली केवळ - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा