शनिवार, ३ जुलै, २०१०

'नभांत उरले...' - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)

बा. सी. मर्ढेकर, विं. दा. करंदीकर ह्यांच्या बरोबरच नवकवींमध्ये गणल्या गेलेल्या इंदिरा संत... जन्म - १९१४. ठिकाण -बेळगाव.

त्यांच्या बराचश्या कविता ह्या त्यांच्या भावविश्वातून प्रकट होतात. त्यात एक तडप आहे, दुःख आहे, विरह आहे, ओढ आहे... बहुतांशी त्यांच्या कवितेचा गाभा प्रेम वा निसर्ग आहे. छंद, यमक, रूपक असल्या चाकोरीबाहेरची मुक्त आणि स्पष्ट कविता आहे त्यांची.


जळराशीची ओढ अनावर
हवीच जर का तुला कळाया,
हवेच व्हाया तुजला वाळू
कणाकणाने... तसे झिजाया.

-- पुण्य न तितुके असते गाठी
शापायला तुला तसे पण;
ओघ गोठला जळराशींतील
नभांत उरले फक्त निळेपण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा