शनिवार, ५ जून, २०१०

अनामी कवीची निनावी कविता

मला अगदी शाळा-कॉलेज मध्ये असल्यापासून कवितांची आवड होती. तेव्हा मी एक वही केली होती. तिला 'मुक्तविचारधारा' असे नाव हि दिले होते. कुठेही काही चांगले वाचले कि मी ह्या वहीत त्याची नोंद करून ठेवायचे. पण कधी कधी त्याबरोबर बाकीचे संदर्भ नाही लिहिले गेले... त्यामुळे हि कविता मला कुठे मिळाली, ती कोणाची आहे हे काहीही मला माहिती नाहीये... (कोणाला जर त्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला कळवावे. )


हि कविता मला खूपच आवडते. सगळ्यात आवडती ओळ शेवटची.

प्रत्येकाची गती निराळी
प्रत्येकाचा पण तालहि तोच
प्रत्येकाचा नाजूक नखरा,
प्रत्येकाचा गहिरा खोच,
प्रत्येकाची रीत निराळी,
प्रत्येकाचे वळणही न्यारे,
प्रत्येकाने, प्रत्येकाच्या प्रत्येकातून जावे कारे?


किती खरं आहे हे... कितीही जवळचे व रक्ताचे नाते असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे असे एक विश्व असतेच आणि ते असावेही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा