शनिवार, १ मे, २०१०

कल्पना

उद्देश: मला कविता वाचायला नेहमीच आवडतात. मोजक्या शब्दात खूप काही सांगायची ताकद शिवाय वाचकाला त्यात सतत काही नवा अर्थ शोधण्याची व सापडण्याची शक्यता ह्या गोष्टींमुळे मला कविता भावते. कविता वाचू लागले कि मी एका वेगळ्या माझ्या आवडत्या विश्वात रमते हे खरे असले तरी नेहमीच्या घाईगर्दीच्या जगात कविता वाचण खूप कमी होऊ लागलंय.... खरतर करमणुकीसाठी TV बघणे वाढल्यामुळेपण असं होतंय... तेव्हा आज माझ्या डोक्यात विचार आला कि आपण एक Blog लिहावा व जगजाहीरच करावं कि आपण दर आठवड्याला त्यात एक कविता लिहिणार आहोत. त्या निमित्ताने माझ्यावर थोडा दबावही राहील. (जे लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे कि दबाव नसेल तर माझे हे काम मागेपाडून मी आणखीन काही नवीन करायला घेतले असेन... असो.. ) शिवाय Blog चा फायदा म्हणजे माझ्या सारख्याच आणखी काही कविता प्रेमींशीही ह्या निमित्ताने संवाद साधता येईल... आणि माझ्या ह्या प्रयोगाला सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिनासारखा सुंदर मुहूर्त मिळाला हा तर खरच एक छान सुयोग म्हणायचा... तर आता माझी हि प्रस्तावना थांबवते व आजच्या कवितेकडे वळते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा