तुझ्या थोडयाश्या हास्यात
तुझा आनंद मावेना
त्याची चाहूल लागली
तुझा श्वासही ठरेना
आता येणार सानुल्या
जाईजुईला बहर
स्वप्नं पुनवेच पडे
उगवली चंद्रकोर
भासे शब्दांत काळजी
मिटे पापणी उत्सुक
गर्भ-रेशमी पदरी
नव्या पालवीचे सुख
एका छोट्या स्पंदनाने
सारा आनंद गावला
तुझ्या-माझ्या जगण्याला
आता.... नवा अर्थ आला
शनिवार, ३१ जुलै, २०१०
नातं - शिल्पा केळकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)
तशी तिची-माझी ओळख जन्मांतरीची
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/३१/२०१० ०७:३५:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

निरोप - योगेश फडणीस ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)
अर्धवट बहर अबोलीचा
अर्ध्यात थांबला झोका
चिंब पावसात एकत्र भिजूनही
तू कसा राहिलास कोरडा.....
मळवट भरला उगवतीचा
वाटेतच थांबला पहाटवारा
एकत्र स्वप्नं रंगवताना
तू कसा मिटलास डोळा....
रिकाम्या ओंजळीचा हात आपला
कंदिलाच्या प्रकाशाने उजळला
दारासमोरच्या सुंदर रांगोळीत
राखेचा रंग का भरलास...
आता प्रवास उरला एकटीचा
पण त्यालाही नसे काही दिशा
मध्यान्हीची उन्हंही उतरली
सावलीसारखा तू रे का दुरावला....
अर्ध्यात थांबला झोका
चिंब पावसात एकत्र भिजूनही
तू कसा राहिलास कोरडा.....
मळवट भरला उगवतीचा
वाटेतच थांबला पहाटवारा
एकत्र स्वप्नं रंगवताना
तू कसा मिटलास डोळा....
रिकाम्या ओंजळीचा हात आपला
कंदिलाच्या प्रकाशाने उजळला
दारासमोरच्या सुंदर रांगोळीत
राखेचा रंग का भरलास...
आता प्रवास उरला एकटीचा
पण त्यालाही नसे काही दिशा
मध्यान्हीची उन्हंही उतरली
सावलीसारखा तू रे का दुरावला....
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/३१/२०१० ०७:३१:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

शनिवार, २४ जुलै, २०१०
राधा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)
रागावणार होती ती त्या काळ्या नभावर
अवेळीच बरसल्याबद्दल
पण तेवढ्यात सुगंध पसरला मातीचा,
अन त्या नभावरच मन जडलं तिचं!
रुसणार होती ती त्या रिमझिम धारांवर
तीन्हीसंजेचा सोनेरीपणा घालवल्याबद्दल -
पण तेवढ्यात फुलून आलं इंद्रधनुष्य,
अन त्या धारांवरच प्रेम बसलं तिचं!
ती नाराजच होती त्या सांजवेळेवर
उगीचच हुरहूर लावल्याबद्दल -
पण तेवढ्यात बासरी घुमली आसमंतात,
अन सोनं झालं तिच्या संध्याकाळीच!!
अवेळीच बरसल्याबद्दल
पण तेवढ्यात सुगंध पसरला मातीचा,
अन त्या नभावरच मन जडलं तिचं!
रुसणार होती ती त्या रिमझिम धारांवर
तीन्हीसंजेचा सोनेरीपणा घालवल्याबद्दल -
पण तेवढ्यात फुलून आलं इंद्रधनुष्य,
अन त्या धारांवरच प्रेम बसलं तिचं!
ती नाराजच होती त्या सांजवेळेवर
उगीचच हुरहूर लावल्याबद्दल -
पण तेवढ्यात बासरी घुमली आसमंतात,
अन सोनं झालं तिच्या संध्याकाळीच!!
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/२४/२०१० ०१:२७:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

आशा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)
त्या अक्राळविक्राळ वृक्षांच्या
अभेद्य तटबंदीमध्ये -
तो काळाशार डोह एकटाच पसरला होता,
म्लान, श्रांत, एकाकी...
सूर्योदय होऊ घातला होता का?
कि आता रात्रीची सुरवात?
डोह वाट पाहत होता - वर्षानुवर्ष
एखादी चाहूल,
एखादी पक्ष्याची लकेर,
निदान एखादा तरंग - त्याचं अंग मोहरून टाकणारा...
पण काळ जणू थांबून गेला होता.
त्या विचारांनी डोह आणखीच काळवंडला,
निराश झाला!
पुन्हा एकदा आक्रसून जाताना
अचानक त्याच्या नजरेत आलं
ते इवलंसं रोपटं -
कशालाही न जुमानता, उन्हाचा एक धीट कवडसा
त्या वृक्षांना भेदून खाली आलं होता,
त्या रोपट्याला कवटाळू पाहत होता -
आणि रोपटं दिमाखात डोलत होतं
वृक्षांच्या नजरेला नजर देत
डोह सुखावला...
ती काळरात्र नव्हती,
सूर्य अजून जागा होता!!!
अभेद्य तटबंदीमध्ये -
तो काळाशार डोह एकटाच पसरला होता,
म्लान, श्रांत, एकाकी...
सूर्योदय होऊ घातला होता का?
कि आता रात्रीची सुरवात?
डोह वाट पाहत होता - वर्षानुवर्ष
एखादी चाहूल,
एखादी पक्ष्याची लकेर,
निदान एखादा तरंग - त्याचं अंग मोहरून टाकणारा...
पण काळ जणू थांबून गेला होता.
त्या विचारांनी डोह आणखीच काळवंडला,
निराश झाला!
पुन्हा एकदा आक्रसून जाताना
अचानक त्याच्या नजरेत आलं
ते इवलंसं रोपटं -
कशालाही न जुमानता, उन्हाचा एक धीट कवडसा
त्या वृक्षांना भेदून खाली आलं होता,
त्या रोपट्याला कवटाळू पाहत होता -
आणि रोपटं दिमाखात डोलत होतं
वृक्षांच्या नजरेला नजर देत
डोह सुखावला...
ती काळरात्र नव्हती,
सूर्य अजून जागा होता!!!
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/२४/२०१० ०१:१६:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

शनिवार, १७ जुलै, २०१०
सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून
ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...
मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....
न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...
मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!
वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला
शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...
तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?
आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...
मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....
न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...
मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!
वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला
शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...
तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?
आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/१७/२०१० ११:३०:०० PM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

लेबल:
'लय',
सुधीर मोघे
शनिवार, १० जुलै, २०१०
अंतरंग - हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)
कधी शोधला स्वप्नगंध... कधी वास्तवाचा रंग!
कधी झाले निःसंग... कधी केला असंगाशी संग...
कधी पुरती रंगले तर कधी फक्त तरंगले!
अंतर्यामीचा षड्ज मात्र नेहमीच जपत आले.
... माझ्या नकळत... पावलोपावली माझेच अंतरंग वेचीत गेले...
कधी झाले निःसंग... कधी केला असंगाशी संग...
कधी पुरती रंगले तर कधी फक्त तरंगले!
अंतर्यामीचा षड्ज मात्र नेहमीच जपत आले.
... माझ्या नकळत... पावलोपावली माझेच अंतरंग वेचीत गेले...
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/१०/२०१० १०:०३:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

लेबल:
अंतरंग,
काव्यसंग्रहातून,
हेमा लेले
हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)
आयुष्य ओळखीचे माझ्या कधीच नव्हते
तरीही बघाल तेव्हा जगण्यात मग्न होते!
नभ शुष्क पोळलेले मौनांत स्तब्ध होते...
तरीही बघाल तेव्हा घनचींब न्हात होते.
जनरीत सांगणारे वारे उजाड होते...
तरीही म्हणाल तेव्हा बहरून येत होते...
जवळीक सांगणारे विषपात्र देत होते!
प्राशून ते कितीदा मी 'कृष्ण!' म्हणत होते...
निमिषात 'तो' ही आला! हातात हात होते!
भरल्या सुखात झुरणे माझे तरी न टळते...
तरीही बघाल तेव्हा जगण्यात मग्न होते!
नभ शुष्क पोळलेले मौनांत स्तब्ध होते...
तरीही बघाल तेव्हा घनचींब न्हात होते.
जनरीत सांगणारे वारे उजाड होते...
तरीही म्हणाल तेव्हा बहरून येत होते...
जवळीक सांगणारे विषपात्र देत होते!
प्राशून ते कितीदा मी 'कृष्ण!' म्हणत होते...
निमिषात 'तो' ही आला! हातात हात होते!
भरल्या सुखात झुरणे माझे तरी न टळते...
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/१०/२०१० ०९:५५:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

लेबल:
अंतरंग काव्यसंग्रहातून,
हेमा लेले
रंग - हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)
आनंदाचा रंग
डोहात तरंग
मन कसे नाचते रे
होऊनी अनंग!
कमळाची मिठी
पाकळ्यांचे गात्र!
खोलवर शोधू या रे
प्रीतीचा 'श्री' रंग
विषयाची गोडी!
नव्हे! ब्रम्हानंदी टाळी...
डोहाच्या पाण्याला की रे
मोक्षाचा तरंग...
डोहात तरंग
मन कसे नाचते रे
होऊनी अनंग!
कमळाची मिठी
पाकळ्यांचे गात्र!
खोलवर शोधू या रे
प्रीतीचा 'श्री' रंग
विषयाची गोडी!
नव्हे! ब्रम्हानंदी टाळी...
डोहाच्या पाण्याला की रे
मोक्षाचा तरंग...
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/१०/२०१० ०९:२५:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

लेबल:
अंतरंग काव्यसंग्रहातून,
रंग,
हेमा लेले
प्रिय - हेमा लेले ( प्रिय ह्या काव्यसंग्रहातून)
- प्रेम म्हणजे रे काय?
आयुष्य जगण्यासाठी जडवून घ्यावा लागतो असा छंद!
- नातं म्हणजे रे काय?
जे असूनही जाणवणार नाही असं!
- दिसणं म्हणजे रे काय?
जे बघितल्यावाचून कळत असं!
- गुंतून जाण म्हणजे रे काय?
जे स्वातंत्र्याच्या उंबरठ्याशी नेतं असं!
- सर्वस्व म्हणजे रे काय?
जे लुटल्यावरच आपण श्रीमंत होतो असं!
- वेडावण म्हणजे रे काय?
शहाणपणाची झींग उतरवत असं!
-आपलं म्हणजे रे काय?
जे दुरूनही दिलासा देतं असं!
आयुष्य जगण्यासाठी जडवून घ्यावा लागतो असा छंद!
- नातं म्हणजे रे काय?
जे असूनही जाणवणार नाही असं!
- दिसणं म्हणजे रे काय?
जे बघितल्यावाचून कळत असं!
- गुंतून जाण म्हणजे रे काय?
जे स्वातंत्र्याच्या उंबरठ्याशी नेतं असं!
- सर्वस्व म्हणजे रे काय?
जे लुटल्यावरच आपण श्रीमंत होतो असं!
- वेडावण म्हणजे रे काय?
शहाणपणाची झींग उतरवत असं!
-आपलं म्हणजे रे काय?
जे दुरूनही दिलासा देतं असं!
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/१०/२०१० १२:४८:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

लेबल:
प्रिय,
प्रिय ह्या काव्यसंग्रहातून,
हेमा लेले
शनिवार, ३ जुलै, २०१०
उरली केवळ - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)
अशीच कधी मी रमले होते
तुडुंबलेल्या चंद्रामध्ये,
चंद्रावरुनी तरंगणाऱ्या
इवल्याइवल्या मेघांमध्ये
माझ्यामध्ये.
डिवचून गेले तोच कुणी तो
क्षणैक हलली
काळी छाया
तिमिराच्या वाऱ्यावर.
तेव्हापासून अखंड आहे जागी.
भिरभिर डोळे
बुडे बाहुली त्या छायेमधी.
थरथर स्पर्शांचे संवेदन
त्या स्पर्शाच्या तुकड्याभवती.
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/०३/२०१० ११:४१:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

वेदना - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)
डोळ्यामधले रक्त थिजावे
ओठहि व्हावे हिरवेकले
आणि गिळावया
लाख वेदना.
ज्या लाखांच्या अंगांगावर
फुटती
फडा उग्रशा, उफाडणाऱ्या
निवडुंगाच्या.
नुरते तेव्हा
माझें... माझें..... मीपण,
नुरती पुढले बेत आणखी
मागील काही आठवण,
नुरते तेव्हा दुखःहि
सांगायचे कण्हून.....
सहस्त्राक्ष त्या फणीफणीला
दिसते एकच :
अंग चोरुनी आहे सरकत
वरती वरती
भयाकूल नभ.
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/०३/२०१० ११:२१:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

'नभांत उरले...' - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)
बा. सी. मर्ढेकर, विं. दा. करंदीकर ह्यांच्या बरोबरच नवकवींमध्ये गणल्या गेलेल्या इंदिरा संत... जन्म - १९१४. ठिकाण -बेळगाव.
त्यांच्या बराचश्या कविता ह्या त्यांच्या भावविश्वातून प्रकट होतात. त्यात एक तडप आहे, दुःख आहे, विरह आहे, ओढ आहे... बहुतांशी त्यांच्या कवितेचा गाभा प्रेम वा निसर्ग आहे. छंद, यमक, रूपक असल्या चाकोरीबाहेरची मुक्त आणि स्पष्ट कविता आहे त्यांची.
त्यांच्या बराचश्या कविता ह्या त्यांच्या भावविश्वातून प्रकट होतात. त्यात एक तडप आहे, दुःख आहे, विरह आहे, ओढ आहे... बहुतांशी त्यांच्या कवितेचा गाभा प्रेम वा निसर्ग आहे. छंद, यमक, रूपक असल्या चाकोरीबाहेरची मुक्त आणि स्पष्ट कविता आहे त्यांची.
जळराशीची ओढ अनावर
हवीच जर का तुला कळाया,
हवेच व्हाया तुजला वाळू
कणाकणाने... तसे झिजाया.
-- पुण्य न तितुके असते गाठी
शापायला तुला तसे पण;
ओघ गोठला जळराशींतील
नभांत उरले फक्त निळेपण!
द्वारा पोस्ट केलेले
Mala Bhavalelya Kavita - Neevedita Patwardhan
येथे
७/०३/२०१० ११:१७:०० AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)